अपयश समजले नसते तर यशाची गोडीही समजली नसती, असं म्हणतात. न्यूटन, अमिताभ बच्चन, नेल्सन मंडेला, किशोरी आमोणकर, शाहरुख खान, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या श्रेष्ठ व्यक्ती अपयशाला सामोऱ्या गेल्या; पण या सर्व जणांनी आपापल्या क्षेत्रांत उत्तुंग यश मिळवलं. या अशा साऱ्या नापास मुलांच्या कहाण्यांचं संपादन अरुण शेवते यांनी केलं आहे. या सगळयांनाच अपयश आलं, संघर्ष करावा लागला; मात्र तोच त्यांच्या प्रगतीचा आरंभकाळ ठरला. याच काळात त्यांचं व्यक्तिमत्व आकाराला आलं. वेळेचं महत्व ठेवून काम करीत रहा, असा मंत्र त्यांनी आपल्या जगण्यातून दिला. अलीकडच्या स्पर्धेच्या युगात आवर्जून वाचाव्यात अशा या कहाण्या.